Monday, 7 September 2020

मराठी अस्मितेच्या नावाने प्रचंड गोंधळ चाललाय.

दोन दिवसांपासून कंगना राणावत आणि मराठी अस्मितेच्या नावाने प्रचंड गोंधळ चाललाय. मुळात मराठी अस्मिता वगैरे गप्पा मारणाऱ्या थोतांड लोकांनी थोडा आपला इतिहास बघावा. मराठी अस्मिता जपली पाहिजे याच मताचा मीही आहे, मराठी अस्मितेला धक्का लागू नये मात्र मराठी अस्मिता ही काही पार्ट टाइम काम करत नाही. राज्यकर्त्यांना जेव्हा पाहिजे तेव्हाच, जेव्हा वाटेल तेव्हाच दुखावली वगैरे म्हणायला. ज्यांना खरंच अस्मिता वाचवायची आहे, जपायची आहे त्यांनी कामातून, आपल्या कृतीतून दाखवावी.
मुळात हा विषय काही सिद्धही करण्याचा नाही! एकवेळ तेही सोडून द्या. प्रत्येकजण आपापल्या परीने ते जपत असतोच.

मात्र सातत्याने शिवसेना आणि राज्य सरकार ज्या पद्धतीने मराठी अस्मितेच्या नावाने चांगभलं गाजवत आहेत त्यांना प्रश्न तर विचारले पाहिजेत.
मराठी अस्मिता म्हणजे काय? फक्त मराठी माणूस? फक्त मराठी संस्कृती? फक्त मराठी विचारधारा? याचं उत्तर काय आहे हे आपल्या आपल्या अंतःकरणाला विचारा!

पण जर होय असेल तर जी शिवसेना आज अस्मितेच्या नावावर गुंडगिरी करतेय ते नेमकं कोणत्या अस्मितेत आहे? महाराष्ट्राचं पावित्र्य अन उंची जपली पाहिजे हे सर्वांना वाटतं, अगदी मलाही! पण त्या आडून जर तुम्ही धमक्या, गुंडगिरी अन मनमानी करत असाल तर कठीण आहे!

शिवसेनेचे संजय राऊत म्हणतात, कंगना राणावत ने इकडे मुंबईत येऊन दाखवावं, आता आज तर म्हणाले, बापाला घेऊन यावं, हरामखोर बाई आहे. ही आहे का मराठी अस्मितेचा उदोउदो करणाऱ्या शिवसेनेची भाषा?
आमदार सरनाईक म्हणाले, कंगनाने मुंबईत पाय ठेऊन दाखवावा, आमच्या रणरागिणी तिचं थोबाड फोडतील!
हे सरनाईक ज्या लोकशाहीच्या जीवावर निवडून गेले ते थोबाड फोडक्याची भाषा करतात हेच मुळात लोकशाहीला लाजिरवाणी गोष्ट आहे. थोबाड कुणाचं फोडता? का फोडता?
तुमच्या त्या रणरागिनींना एक निरोप द्या! संजय राऊत सैनिकांना तंबाखू चोळत बसले होते का म्हणाले, तेव्हा कुठे गेल्या होत्या रणरागिणी? त्यांना सांगा, कोरोना कॉरंटाईन सेंटरमध्ये बलात्कार होताहेत, महाराष्ट्रातल्या कोणत्याच रुग्णालयात सहज उपचार मिळत नाहीत, ऑक्सिजन नाही, बेड नाही, व्हेंटिलेटरवर नाही,  राज्यातल्या पोलिसांना खुलेआम मारले जातेय, साधूंना पोलिसांच्या देखत मारले जाते, राज्यातल्या सर्वसामान्य माणसाना मुद्दामहुन वीजबिल वाढवून लुटणे सुरुय, सामान्य माणसांना बंगल्यावर नेऊन मारले जाते, रोज खून सुरू आहेत, 20 रुपयांचा मास्क 200 रुपयांना विकताहेत, गरिबांना दिलेले धान्य थेट परदेशात विकले जातेय, डॉक्टरांना, अंगणवाडी सेविकांना, आशा वर्करला, एस टी कामगारांना पगार मिळत नाही. हे इतकं सगळं सुरुय अन त्याला जबाबदार असणाऱ्यांचे थोबाड फोडा! जर तुम्ही यांचं थोबाड फोडलं तर लोक जाहीरपणे तुमचे सत्कार घेतील, कौतुक करतील.
कारण ही आजच्या क्षणाची गरज आहे.
पण ते तुमच्याने होणार नाही, सोडून द्या.

मराठी माणसांची मराठी अस्मिता असणाऱ्या मुंबईत आज पालकमंत्री कोण आहेत? शिवसेनेचे अस्मिता प्रेम राज्यसभेत का दिसत नाही? आज राज्यसभेत प्रियांका चतुर्वेदी आहेत. ज्या चतुर्वेदी आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचं नाव "बाळ ठाकरे" असं घ्यायच्या. मागच्या महिन्यात मुंबईत करिष्मा भोसले नावाची एक भगिनी मशिदीवरचे भोंगे उतरवा म्हणून आवाज उठवत होती तेव्हा तिच्या पाठीशी शिवसेना का नव्हती? उलट आझमीने तिला मुंबई सोडून जा अशी धमकी दिली तरीही शिवसेना का आली नाही? मराठी अस्मितेचं नाव घेता न, मग ज्यावेळी सैराट हा मराठी सिनेमा आला तेव्हा याच शिवसेनेने विरोध का केला होता? आज राज्यातील दारू अन बार सुरू आहेत पण मंदिरे का बंद आहेत? आज राज्यात हजारो मराठी माणसं मरताहेत मात्र घराचे दार लावून उद्धव ठाकरे बसले आहेत? मरणारी मराठी माणसंच आहेत मग आता अस्मिता कुठेय? एक अबू आझमी महिला पोलीस अधिकाऱ्याला जाहीर धमकी देतो अन त्याला घाबरून सरकार बदली करते तिथे अस्मिता झोपली होती का? केम छो वरळीचे पोस्टर शिवसेनेने लावले तेव्हा मराठी अस्मिता नव्हती का? किरण राव म्हणाली होती की भारतात सुरक्षित वाटत नाही तेव्हा रणरागिणी आणि अस्मिता कुठे गेली होती? उद्धव ठाकरे पोलीस अधिकाऱ्यांना म्हणाले होते की,भाजपाची धुणीभांडी करू नका, राजीनामा द्या, संडास बाथरून धुवा. हा अस्मितेचा अपमान नव्हता का?
आझाद मैदानावर दंगे करणाऱ्या रझा अकादमीला मांडीला मांडी लावून बसता तेव्हा मराठी अस्मिता सुट्टीवर होती का? नवाब मलिकचा भाऊ कप्तान मलिक जेव्हा मराठी कामगाराला मारहाण करतो तेव्हा शिवसेना अन मराठी अस्मिता कुठे होती? तेही सगळं सोडून द्या. छत्रपती शिवरायांच्या नावाने पक्ष काढला, राजकारण करता त्या शिवरायांच्या वंशजांना संजय राऊतांनी पुरावे मागीतले तेव्हा या थोबाड फोडणाऱ्या रणरागिणी अन अस्मिता कुठे गेली होती? छत्रपती उदयनराजेंनी खासदारकीची शपथ घेतल्यानंतर सभागृहात जय भवानी जय शिवाजी या घोषणेवर आक्षेप घेतला तेव्हा अस्मिता कुठे होती? शिवसेना अन रणरागिणी तेव्हा का गेल्या नाहीत?
हे एवढेच नाही अनेक प्रश्न आहेत मराठी अस्मिता असलेल्या महाराष्ट्राच्या मनात.

मराठी अस्मितेच्या नावाने राजकारण करणाऱ्यांना एवढंच सांगतो, "बात निकली हैं तो दुर तक जायेगी।"
ज्या दिवशी शिवसेना ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सोबत सत्तेत बसली तेव्हाच मराठी अस्मितेचा जीव गुदमरला. अन जेव्हा सोनिया गांधींच्या बैठकीत खुद्द उद्धव ठाकरे यांनी इजाजत, माफी मागितली तेव्हा तिचा अंत झाला.

राजकारणाने आता कुस बदलली आहे, विकासाच्या मुद्द्यावर या, कोकणात वादळी वाऱ्याने मराठी माणसांचे संसार उध्वस्त झाले तेव्हा सरकार कुठे होते? पाऊस येणार म्हणून दौरा रद्द करणारे उद्धव ठाकरे अन शिवसेना आज मराठी अस्मिता सांगते? मराठा मोर्चाच्या आंदोलनावर आठवा काय होते व्यंगचित्र? आज विदर्भात पूर आला आहे, उद्धव ठाकरे चकार शब्द बोलले नाहीत, ना त्यांच्या मदतीला कोणी धावून गेले. तिथं संकटात अडकलेली लाखो माणसं ही मराठी आहेत. कुठेय आता अस्मिता?

कंगना राणावत हा काही खूप मोठा विषय नाही. तिचं थोबाड फोडायला जाणाऱ्या रणरागिणी अन शिवसैनिकांनो सगळी ताकद जर राज्यातल्या तरफडणाऱ्या रुग्णांना बेड मिळावे, ऑक्सिजन मिळावा, व्हेंटिलेटर मिळावे, अम्ब्युलन्स मिळावी यासाठी लावली तर खऱ्या अर्थाने अस्मितेचा झेंडा उंचावेल.
मराठी अस्मिता ही जपण्याचा, अंगिकरण्याचा अन कृतीतून सार्थ करण्याचा विषय आहे. एवढं जरी करता या तर पुरेसं आहे. बाकी सगळं आलबेल आहे! जोवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत आहे तोवर तरी अस्मितेवर राजकारण करू नका, तो अधिकार नाही तुम्हाला! तुमचं सगळं सोयीस्कर घ्यायला राज्यातली लोकं काय धोतरावर इन करत नाहीत!🙏🙏

(पटलं तर अवश्य शेअर करा.)

Monday, 6 July 2020

कोरोना positive एका वक्तीची प्रत्यक्ष अनुभव.

आपणास झालेला कोरोना या आजारापासून आपण पूर्णपणे बरे होऊ शकतो ते ठिकाण म्हणजे पनवेल उपजिल्हा रुग्णालय.
     माझ्यासाठी सुपर हिरो आहेत ते म्हणजे पनवेल उपजिल्हा रुग्णालय येथिल संपूर्ण रूग्णालय स्टाफ , नर्स, डॉक्टर्स , पॅरामेडिल स्टाफ, वॉर्डबोय,सफाई कर्मचारी. आहेत.
आज ते स्वतःच्या आरोग्याचा विचार न करता पुर्ण वेळ कोरोना रुग्णाच्या सेवेसाठी स्वतःला वाहून घेतेले आहे.
मी स्वतः हा कोरोना रुग्ण होतो .१९ तारखेला माझी कोरोना टेस्ट पझिटिव्ह आली होती .हे समजतात मला मानसिक धक्का बसला . आणि मला उपजिल्हा रुग्णालय पनवेल येथे ऍडमीट  करण्यात आले . वॉर्ड न.२९.
ऍडमीट झाल्यावर पहिले १५ मिनिटे अस वाटल की माझ्या आयुषयातील शेवटच्या दिवसांचा प्रवास चालू झाला आहे.

पण थोड्याच वेळात माझ्या समोर उभे होते डॉक्टर्स वेषेतील असलेले देवदूत म्हणजे पनवेल उपजिल्हा रुग्णालय येथिल संपूर्ण  स्टाफ .
माझी संपूर्ण आरोग्य तपासणी करण्यात आली .माझा एक्स रे, ECG., रकत्तपासणी करण्यात आली . आणि माझा कारोनामुक्तीचा प्रवास सुरू झाला.
पनवेल उपजिल्हा रुग्णालय येथिल सर्व स्टाफ ने वेळोवेळी माझ्या आरोग्याविषीची विचारणा केली . वेळोवेळी ऑक्सीमीटर ने मोनिटरेट करण्यात आले. वेळोवेळी लागणारे औषधे , गरम पणी देण्यात आले.
पनवेल उपजिल्हा रुग्णालय येथिल येणारं सकाळचा नाष्टा, दुपारचे आणि रात्रीचे जेवण उतम प्रतिचे होते .तसेच तेथील सफाई कर्मचारी चांगल्या प्रकारे स्वछता ठेवतात.
एवढं सगळं या सर्व पनवेल उपजिल्हा रुग्णालय येथील स्टाफ ने स्वतःच्या आरोग्य जपून न घाबरता सर्व रुग्णांची रात्रंदिवस सेवा केली आहे आणि अहोरात्र सेवा करत आहेत.

अशा या पनवेल उपजिल्हा रुग्णालयातील संपूर्ण स्टाफ ला माझा संस्नेह नमस्कार.

आणि मला २४ जुन रोजी मला कारोनामुक्त करून सोडण्यात आले.

उपजिल्हा रुग्णालय,वॉर्ड न.२९
बरे झालेल्या रुग्णाचे नाव.
अजित पाटील

Thursday, 5 March 2020

संपुर्ण जुहूचा मालक एक घाटी माणूस होता. नाव रघुनाथराव राणे. "जुहू"

*.*
मुंबईमधली स्वप्ननगरी. पर्यटकांनी भरलेला जुहू बीच आणि डोक्यावरून टोपी खाली पडेल अशा उंच उंच इमारती. इथल्या भेळपुरीपासून ते अमिताभ बच्चनच्या घरापर्यंतच्या अनेक कथा दंतकथा आपण ऐकलेल्या असतात. इथल्या शांत निवांत गल्ल्यांमध्ये मराठी माणसाला घाटी म्हणून हिणवणारे अतिउच्चभ्रू सेलिब्रिटी श्रीमंत लोक राहतात.

पण त्यांना काय ठाऊक या सेलिब्रिटीच्या जुहूचा मालक एक घाटी माणूस होता. नाव रघुनाथराव राणे.
जुहूचा इतिहास पहायचा झाला तर कमीत कमी हजार वर्षापूर्वीचे पुरावे सापडतात. बिम्बाख्यान नावाच्या बखरी नुसार ११३८ साली चंपानेरच्या प्रताप बिंब राजाने महिकावती (आजचे केळवे माहीम) हा भाग जिंकून घेतला. त्याने आपला प्रधान बाळकृष्ण सोमवंशीला वाळकेश्वर येथे पाठवल आणि या नव्या भागाचा सर्व्हे करायला सांगितला.

या बाळकृष्ण सोमवंशीने केळवे माहीम, ठाणे, मढ, जुहू, वेसावे(व्ह्र्सोवा), वहिनाळे आणि अखेर वाळकेश्वर या भागात तो फिरला. हाच जुहूचा पहिला उल्लेख. अगदी शंभर वर्षापूर्वी पर्यंत जुहू हे एक बेट होतं. अल्लाउद्दिन खिलजीकडून पराभूत झालेला सोरठचा मुरारराज या भागात आला. त्याच्या मुलाने बलदेवराजने बिंबराजाचे राज्य मुंबई भागात प्रस्थापित केले.

१३०० च्या शतकात बलदेवराजचा मुलगा म्हणजे हैबतराव राणे. वांद्र्याच्या रन्वार खेड्यात तो राहू लागला. येथेच त्याने माहेश्वरी देवीच मंदिर बांधलं. याच हैबतरावाचे वंशज लक्ष्मणराव जुहूला वसले.
पुढे दिल्लीच्या सुलतानीच्या काळात लक्ष्मणराव राणेंना जुहू गावाची पाटीलकी मिळाली. त्यांचा वार्षिक पगार होता ५० रुपये.

पुढे मुंबई प्रांतावर पोर्तुगीजांचे राज्य आले. त्यांनी मुंबई इंग्रजांना आंदण म्हणून दिली मात्र उत्तरेतील भाग मात्र स्वतःच्या हाती ठेवला. त्यांनी जुहूला जुवेम नाव दिले होते. तेथे भंडारी, मीठ व्यापारी शेती करणाऱ्यांच्या छोट्या वसाहती होत्या. जुहूचे रहिवासी प्रामुख्याने कोळी लोक होते. पोर्तुगीजांनी येथे १८५३ साली चर्च ऑफ सेंट जोसेफ हे चर्च बांधले.

अस म्हणतात की या राणेंच्या पैकी कोणी तरी पोर्तुगीजांच्या विरोधात मराठा आरमाराला मदत केली होती. पुन्हा तसे होऊ नये म्हणून पोर्तुगीजांनी त्यांच्या संरक्षणाची ग्वाही दिली आणि हे सुनिश्चित केले की राणे कुटुंब जुहूमध्ये राहील.

पण तरीही जेव्हा १७३७ साली पोर्तुगीज आणि मराठा युद्ध सुरु झाले तेव्हा राणेनी मराठ्यांची बाजू घेतली.
पुढच्या दोनच वर्षात चिमाजी अप्पाने वसईचा किल्ला जिंकून पोर्तुगिजांचा पराभव केला आणि साळशेत, ठाणेचा परिसर पेशव्यांच्या अधिपत्या खाली आला.त्यांनी राणेंना जुहूची सनद आणि तिथे नारळाची लागवड करण्याची परवानगी दिली.पुढे हा भाग मराठ्यांच्या कडून इंग्रजांच्या ताब्यात गेला मात्र त्यांनी देखील राणेंच जुहूंवरचे हक्क मान्य केले.

याच राणेंचे वंशज रघुनाथराव पुतळाजी राणे हे बॉम्बे पोर्ट ट्रस्टचे हेड सर्व्हेअर म्हणून काम पहात होते. १८६८ साली जुहूमधील जुन्या मुक्तेश्वर मंदिराचे जीर्णोद्धार करत असताना त्यांना मध्ययुगीन पुरावे सापडले.

काही वर्षांनी जेव्हा त्यांनी मुक्तेश्वर मंदिराच्या पाठीमागच्या बाजूस ब्रम्हकुंड नावाच्या बंधिस्त कुंडाची निर्मिती करण्यासाठी खड्डा काढला तेव्हा त्यात त्यांना गजलक्ष्मीची मूर्ती सापडली.
हिलाच आज शितलादेवी म्हणून पूजले जाते व जुहू बीच जवळ मिळालेल्या मूर्तीला जुहूची ग्रामदेवता म्हणून पूजले जाते. जुहूमध्ये उत्खनन करत असताना एक हाडांचा सांगाडा सापडला ज्याच्या तोंडात एक सोन्याच नाणं होतं ज्यावर देवनागरी मध्ये ‘रा’ असे कोरलेले आढळले. अशा अनेक गोष्टी राणे कुटुंबाने जपून ठेवल्या होत्या.

रघुनाथ राव राणेंचे सुपुत्र सुप्रसिद्ध चित्रकार कृष्णराव राणेंनी या ऐतिहासिक पुराव्यांचे म्युजियम मध्ये रुपांतर केलं. पण १९५५ साली आलेल्या चक्रीवादळात या म्युजियमच प्रचंड नुकसान झाल व ते आता बंद आहे. मात्र आजही इस्कॉन टेम्पल समोरच्या राणे बंगल्यात यातील अनेक वस्तू आपल्याला पाहता येऊ शकतात.

आज गगनचुंबी इमारतींचे जंगल बनलेल जुहू १०० वर्षापूर्वी पर्यंत एका छोट्याशा बेटावरील खेड होतं.
जमशेदजी टाटानी १८९० च्या दशकात येथे जमीन खरेदी केली आणि तिथे एक बंगला बांधला. पुढे इथे १२०० एकर जमीन घेऊन तिथे रिसोर्ट बांधायचा त्यांचा प्लॅन होता. कालव्यांनी जोडून जुहू बेटाचं व्हेनिसमध्ये रुपांतर करायचं टाटांच स्वप्न होतं. पण दुर्दैवाने त्यांच्या मृत्युनंतर ही योजना मागे पडली.

१९१९ साली जुहूमध्ये नगरपालिकेची स्थापना झाली. इंग्रजांनी सांताक्रूझ जुहू रस्ता बनवला आणि या भागाला मुंबईशी जोडून टाकले. याच जुहूमध्ये भारतातील पहिले विमानतळ सुरु झाले. मिठाचा सत्याग्रह व इतर आंदोलनातून जुहूनेदेखील स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला. गांधीजींचे इथे बरेच काळ वांस्तव्य देखील होते.

स्वातंत्र्यानंतरच्या काळात इथे अनेक धनिकांनी, फिल्मस्टारनी जागा घेतली. भारतातील सर्वात महागडे दराच्या जमिनीमध्ये वरच स्थान जुहूने पटकावल. मात्र याच बरोबर इथला स्थानिक कोळी हळूहळू आपल्याच हक्काच्या घरातून हद्दपार होत गेला.

Thursday, 13 February 2020

‘श्रीरामाने खालेले कंदमुळ’ म्हणून विकले जाणारे काप म्हणजे नेमके काय हे कळल्यावर धक्काच बसेल

‘श्रीरामाने खालेले कंदमुळ’ म्हणून विकले जाणारे काप म्हणजे नेमके काय हे कळल्यावर धक्काच बसेल

तुम्ही वाडी रत्नागिरी अर्थात जोतिबा डोंगरावर कधी गेलाय का, मग तिथे काही विक्रेते श्री रामाने खाल्लेले कंदमुळ म्हणून एका भल्या मोठ्या ओंडका सदृश्य मांसल कंदाचे काप विकत असताना तुम्ही पाहिले असेल, पण ते नेमकं काय आहे याचा कुणी विचार कधी केलाय का. हे कंदमुळ वगैरे काही नाही, तर ते आपल्याकडे आढळणा-या एका वनस्पतीचा खोडाचा भाग आहे.


जोतिबावर जाणा-या अनेक पिढ्यांनी हे कंदमुळ खाल्लं असेल, आणि श्रीरामाने खाल्लेय म्हणून आपणही ते श्रद्धेनं खाल्ल असेल. वनवासाच्या काळात राम सीता आणि लक्ष्मण यांनी हे कंदमुळं खाऊन दिवस काढले असल्याचे विक्रेते सांगतात, त्यामुळे लहानमुलं तर हमखास ते काप खातात. हे एवढं मोठं मुळ कुठल्या वनस्पतीचं असेल असा प्रश्नही अनेकांना पडतो, पण ते विक्रेते सांगतात की हे मुळ जंगलात मिळतं.

कोल्हापूरातल्या काही संशोधकांनी या सगळ्या फसवणुकीवरचा पडदा उठवला आहे. कोल्हापूरातील वनस्पती शास्त्रज्ञ डॉ. विनोद शिंपले, डॉ. निलेश पवार, डॉ. मानसिंगराज निबाळकर यांना याबाबत शंका आली. हे नेमके कुठलं मुळ आहे, आणि हे खरंच कंदमुळ आहे का हे शोधण्याचा प्रयत्न केला. विक्रेत्यांना विचारले असता हे मुळ आफ्रिकेहून आयात करण्यात आले आहे, असे सांगण्यात आले.


त्यांनी असे कंदमुळ विकणा-याकडून काही काप खरेदी केले. प्रयोगशाळेत या वनस्पतीची संरचना तपासली. त्यामुळे कंदमुळ म्हणून विकला जाणारा हा काप मुळाचा नसून एकदल खोडाचा असल्याचे त्यांच्या लक्षात आले. ही वनस्पती बाहेरून आयात केलेली नसून आपल्याकडे माळरानावर आढळणारी केकताड किंवा घायपात ही वनस्पती आहे. या वनस्पतीपासून वाक तयार करून त्यापासून दोरखंड बनवले जात होते.

ही वनस्पतीची पूर्ण वाढ झाल्यानंतर तिला मधोमध एक बांबुसारखा कोंब येतो. त्याच्या टोकाला फुलोरा येऊन त्याला बीज लागतात. या फुलातून बीज रुजून त्याला या झाडावरच त्याची छोटी छोटी पिलं तयार होतात. हे या वनस्पतीचे वैशिष्ट्ये आहे.

या अवस्थेत वरचा बांबू आणि बाजूची पाने काढून टाकून मध्ये अननसासारखा भला मोठा भाग मिळतो. त्यातील पानाचा भाग तासून टाकून त्यावर रंधा मारला की पूर्ण सफेद रंगाचा कंदासारखा भाग तयार होतो, त्यावर लाल रंगाची काव लावून तो मातीतून काढलेला आहे, असे भासवून त्याची कंद म्हणून विक्री केली जाते.


संशोधकांनी जनुकीय चाचणी करून या वनस्पतीच्या कुळाचा शोध घेतला. डीएनए बारकोडींग पद्धतीचा वापर करण्यात आला . कंद म्हणून विकले जाणारे हे काप नैसर्गिक रित्या गोड नसतात, त्यावर सॅकरीन टाकून ते गोड करण्यात येते. पण त्यामध्ये व्हीकोजेनीन नावाचे स्ट्युराईड असते. त्यामुळे हे अतिप्रमाणात खाल्यास अपायकारक ठरू शकते असे तज्ज्ञांचे मत आहे.

Tuesday, 11 February 2020

आत्महत्या करने के बाद क्या होता है आत्मा के साथ, जानिए रहस्य...

#जय_श्री_हरि_विष्णु
आत्महत्या करने के बाद क्या होता है आत्मा के साथ, जानिए रहस्य...

हिन्दू धर्मानुसार मरने के बाद आत्मा की मुख्यतौर पर तीन तरह की गतियां होती हैं-

1.उर्ध्व गति

2.स्थिर गति और

3.अधोगति।

इसे ही अगति और गति में विभाजित किया गया है।

पहली बात तो यह कि आत्महत्या शब्द ही गलत है, लेकिन यह अब प्रचलन में है। आत्मा की किसी भी रीति से हत्या नहीं की जा सकती। हत्या होती है शरीर की। इसे स्वघात या देहहत्या कह सकते हैं। दूसरों की हत्या से ब्रह्म दोष लगता है लेकिन खुद की ही देह की हत्या करना बहुत बड़ा अपराध है। जिस देह ने आपको कितने भी वर्ष तक इस संसार में रहने की जगह दी। संसार को देखने, सुनने और समझने की शक्ति दी। जिस देह के माध्यम से आपने अपनी प्रत्येक इच्‍छाओं की पूर्ति की उस देह की हत्या करना बहुत बड़ा अपराध है। जरा सोचिए इस बारे में। आपका कोई सबसे खास, सगा या अपना कोई है तो वह है आपकी देह।*

वैदिक ग्रंथों में आत्मघाती दुष्ट मनुष्यों के बारे में कहा गया है:-

असूर्या नाम ते लोका अन्धेन तमसावृता।
तास्ते प्रेत्यानिभगच्छन्ति ये के चात्महनो जना:।।

अर्थात:– आत्मघाती मनुष्य मृत्यु के बाद अज्ञान और अंधकार से परिपूर्ण, सूर्य के प्रकाश से हीन, असूर्य नामक लोक को गमन कहते हैं।

अधर में लटक जाती आत्मा :–

गरूड़ पुराण में जीवन और मृत्‍यु के हर रूप का वर्णन किया गया है। आत्‍महत्‍या को निंदनीय माना जाता है, क्‍योंकि धर्म के अनुसार कई योनियों के बाद मानव जीवन मिलता है ऐसे में उसे व्‍यर्थ गंवा देना मूर्खता और अपराध है।

कहते हैं कि जो व्‍यक्ति आत्‍महत्‍या करता है उसकी आत्‍मा हमारे बीच ही भटकती रहती है, न ही उसे स्‍वर्ग/नर्क में जाने को मिलता है न ही वह जीवन में पुन: आ पाती है। ऐसे में आत्‍मा अधर में लटक जाती है। ऐसे आत्मा को तब तक ठिकाना नहीं मिलता जब तक उनका समय चक्र पूर्ण नहीं हो जाता है। इसीलिए आत्‍महत्‍या करने के बाद जो जीवन होता है वो ज्‍यादा कष्‍टकारी होता है।

जीवन के चक्र को समझना जरूरी है :–

जैसे पूर्ण पका फल ही खाने योग्य होता है। जब फल पक जाता है तभी वह वृक्ष को त्याग कर खुद ही वृक्ष बनने की राह पर निकल पड़ता है। इसी तरह पूर्ण आयु जीकर मरा मनुष्य अच्छे जीवन के लिए निकल पड़ता है। कहते हैं कि मानव जीवन के 7 चरण होते हैं और प्राकृतिक प्रक्रिया के अनुसार, एक के पूरा होने के बाद ही दूसरी शुरू होती है। इसका सही समय और सही क्रम होता है। ऐसे में समय से पूर्व ही मृत्‍यु हो जाने से क्रम गड़बड़ हो जाता है। जिन व्‍यक्तियों की मृत्‍यु प्राकृतिक कारणों से होती है उनकी आत्‍मा भटकती नहीं और नियमानुसार उनके जीवन के 7 चरण पूरे हो चुके होते हैं। लेकिन जिन लोगों की मृत्‍यु, आत्‍महत्‍या करने के कारण होती है वो चक्र को पूरा न कर पाने के कारण अधर में रह जाते हैं।

मरने के बाद कब मिलता है दूसरा शरीर?

उपनिषद कहते हैं कि अधिकतर मौकों पर तत्क्षण ही दूसरा शरीर मिल जाता है फिर वह शरीर मनुष्य का हो या अन्य किसी प्राणी का। पुराणों के अनुसार मरने के 3 दिन में व्यक्ति दूसरा शरीर धारण कर लेता है इसीलिए तीजा मनाते हैं। कुछ आत्माएं 10 और कुछ 13 दिन में दूसरा शरीर धारण कर लेती हैं इसीलिए 10वां और 13वां मनाते हैं। कुछ सवा माह में अर्थात लगभग 37 से 40 दिनों में।

बहुत कम ऐसे लोग हैं जिन्हें 40 दिन बाद भी शरीर नहीं मिलता। उनमें से अधिकतर घटना, दुर्घटना में मारे गए या आत्महत्या वाले लोग ही ज्यादा होते हैं। ऐसे लोग यदि प्रेत या पितर योनि में चला गया हो, तो यह सोचकर 1 वर्ष बाद उसकी बरसी मनाते हैं। अंत में उसे 3 वर्ष बाद गया में छोड़कर आ जाते हैं। वह इसलिए कि यदि तू प्रेत या पितर योनि में है तो अब गया में ही रहना, वहीं से तेरी मुक्ति होगी।

किसे कहते हैं भूत :–

जिसका कोई वर्तमान न हो, केवल अतीत ही हो वही भूत कहलाता है। अतीत में अटका आत्मा भूत बन जाता है। जीवन न अतीत है और न भविष्य वह सदा वर्तमान है। जो वर्तमान में रहता है वह मुक्ति की ओर कदम बढ़ाता है। आत्मा के तीन स्वरुप माने गए हैं- जीवात्मा, प्रेतात्मा और सूक्ष्मात्मा। जो भौतिक शरीर में वास करती है उसे जीवात्मा कहते हैं। जब इस जीवात्मा का वासना और कामनामय शरीर में निवास होता है तब उसे प्रेतात्मा कहते हैं। यह आत्मा जब सूक्ष्मतम शरीर में प्रवेश करता है, तब उसे सूक्ष्मात्मा कहते हैं।

इसी तरह जब कोई स्त्री मरती है तो उसे अलग नामों से जाना जाता है। माना गया है कि प्रसुता, स्त्री या नवयुवती मरती है तो चुड़ैल बन जाती है और जब कोई कुंवारी कन्या मरती है तो उसे देवी कहते हैं। जो स्त्री बुरे कर्मों वाली है उसे डायन या डाकिनी करते हैं। इन सभी की उत्पति अपने पापों, व्याभिचार से, अकाल मृत्यु से या श्राद्ध न होने से होती है। इसी तरह जब कोई पुरुष मरता है तो वह भूत, प्रेत, पिशाच, कूष्मांडा, ब्रह्मराक्षस, वेताल या क्षेत्रपाल हो जाता है।

अतृप्त आत्माएं बनती है भूत :–

जो व्यक्ति भूखा, प्यासा, संभोगसुख से विरक्त, राग, क्रोध, द्वेष, लोभ, वासना आदि इच्छाएं और भावनाएं लेकर मरा है अवश्य ही वह भूत बनकर भटकता है। और जो व्यक्ति दुर्घटना, हत्या, आत्महत्या आदि से मरा है वह भी भू‍त बनकर भटकता है। ऐसे व्यक्तियों की आत्मा को तृप्त करने के लिए श्राद्ध और तर्पण किया जाता है। जो लोग अपने स्वजनों और पितरों का श्राद्ध और तर्पण नहीं करते वे उन अतृप्त आत्माओं द्वारा परेशान होते हैं।

अकाल मृत्यु क्या होती है?

अकाल का अर्थ होता है असमय। प्रत्येक व्यक्ति को परमात्मा या प्रकृति की ओर से एक निश्चित आयु मिली हुई है। उक्त आयु के पूर्व ही यदि व्यक्ति हत्या, आत्महत्या, दुर्घटना या रोग के कारण मर जाता है तो उसे अकाल मौत कहते हैं। उक्त में से आत्महत्या सबसे बड़ा कारण होता है। शास्त्रों में आत्महत्या करना अपराध माना गया है। आत्महत्या करना निश्चित ही ईश्वर का अपमान है। जो व्यक्ति आत्महत्या कर लेता है वह मृत्यु के उपरांत तुरंत ही प्रेत बनकर अनिश्चित काल के लिए भटकता रहता है। उसे उस दौरान अनेक कठिनाइयों को सहना होता है। पीड़ा और पछतावा ही उसके प्रेत जीवन का प्रसंग बन जाता है।

मरने के उपरांत नया जन्म मिलने से पूर्व जीवधारी को कुछ समय सूक्ष्म शरीरों में रहना पड़ता है। उनमें से जो अशांत होते हैं, उन्हें प्रेत और जो निर्मल होते हैं उन्हें पितर प्रकृति का निस्पृह उदारचेता, सहज सेवा, सहायता में रुचि लेते हुए देखा गया है।

पंडितजी का मानना है कि मरणोपरांत की थकान दूर करने के उपरांत संचित संस्कारों के अनुरूप उन्हें धारण करने के लिए उपयुक्त वातावरण तलाशना पड़ता है, इसके लिए प्रतीक्षा करनी पड़ती है। वह समय भी सूक्ष्म शरीर में रहते हुए ही व्यतीत करना पड़ता है। ऐसी आत्माएं अपने मित्रों, शत्रुओं, परिवारीजनों एवं परिचितों के मध्य ही अपने अस्तित्व का परिचय देती रहती हैं। प्रेतों की अशांति संबद्ध लोगों को भी हैरान करती हैं।

यदि आत्महत्या करने वाला व्यक्ति अत्यन्त विवश होकर आत्महत्या कर रहा है तो उसकी कोई इच्छा अधूरी रह गई है या वह गहरे तनाव के कारण ऐसा कर रहा है। ऐसी आत्मा की मुक्ति मुश्‍किल होती है। मुक्ति का अर्थ है या तो नया शरीर मिल जाए या मोक्ष मिल जाए। संतों तक को मोक्ष नहीं मिलता तो सामान्य की बात अलग है। अत: परेशान या अतृप्त आत्मा मुक्ति नहीं हो पाती और वह भूत, प्रेत या पिशाच जैसी योनि धारण कर भटकती रहती है। वह कम से कम तब तक भटकती है जब तक की उसके मृत शरीर की निर्धारित उम्र पूर्ण नहीं हो जाती या फिर श्राद्ध, तर्पण आदि धार्मिक कार्य से उसे मुक्ति नहीं मिलती।

आत्महत्या के बाद भी मिलता है नया जीवन:–

हिंदू धर्म अनुसार आत्महत्या करने के बाद भी व्यक्ति को जल्द ही दूसरा जन्म मिल सकता है लेकिन शर्त यह है कि उस व्यक्ति ने अपने जीवन में अच्छे कर्म किए हो और उसकी कोई इच्छा नहीं रही हो। ऐसा शांत चित्त व्यक्ति भी अपने अगले जीवन की यात्रा पर निकल सकता है। हालांकि उसे अपनी देह की उम्र का समय सूक्षात्मा के रूप में रहकर ही भुगतना होता है। लेकिन यहां यह स्पष्ट कर देना उचित है कि ऐसे व्यक्ति को मोक्ष नहीं मिलता। मोक्ष तो जन्म और मरण से मुक्त होकर अपने आनंदस्वरूप में स्थित होना होता है। आत्महत्या करने का अर्थ ही यही है कि आप अभी मानसिकरूप से परिपक्व नहीं हैं।

आत्महत्या के परिणामों से मुक्ति के उपाय :

गुरूड़ पुराण में आत्महत्या के कारणों से मृत आत्मा की शांति हेतु कई उपाय बताए गए हैं। इसमें मृत आत्मा हेतु तर्पण करना, सद्कर्म करना (दान, पुण्य और गीता पाठ), पिंडदान करना, मृत आत्मा की अधूरी इच्छा को पूर्ण करना प्रमुख है। यह कार्य कम से कम तीन वर्ष तक चलने चाहिए तभी मृत आत्मा को मुक्ति मिलती है। तर्पण करने, धूप देने आदि से मृत आत्माएं तृप्त होती है। तृप्त और संतुष्ट आत्माएं ही दूसरा शरीर धारण कर सकती है या वैकुंठ जा सकने में समर्थ हो पाती है।